कषाय

मनात भावना आटतायेत, पण बांध तरी तसाच. शब्दात शब्द गाठतायेत, पण अर्थ मात्र लपलाच. तरी आता पाय चालतात; एका नवीन सूर्याची पहाट, एका नवीन स्वप्नाची चाहूल, निराशेच्या अंधारात आशा धरून! आता पाय चालतायेत. आणि चालायचा निमित्त मात्र एवढाच; एक आवाज, तुझा , विश्वास तुझा! आणि पायवाटाशी धरून ठेवणारा, हातात हात तुझा. ~ K